
sumeets blog
Friday, August 27, 2010
Thursday, August 26, 2010
sumeets blog: व्यर्थ न हो बलिदान !
sumeets blog: व्यर्थ न हो बलिदान !: "व्यर्थ न हो बलिदान ! 'मुंबै'' कुणाची, मराठी माणसांची? छे छे! विसरा ती स्वप्ने कायमची !१९६० साली महाराष्ट्रराज्यनिर्मिती झाली तेव्हा मुंबईत म..."
व्यर्थ न हो बलिदान !
व्यर्थ न हो बलिदान !
"मुंबै'' कुणाची, मराठी माणसांची? छे छे! विसरा ती स्वप्ने कायमची !१९६० साली महाराष्ट्रराज्यनिर्मिती झाली तेव्हा मुंबईत मराठी माणसाचे प्रमान ५४ टक्के होते. आज २५ वर्षांनंतर ते २५ टक्क्यांहून कमी आहे. मोडकळीला आलेली मराठी माणसांची घरे, जागांच्या किंमतीत झालेली बेसुमार वाढ, प्रचंड लोकवस्ती आणि प्रतिदिनी "मुंबै" वर आदळणारे परप्रांतीयांचे लोंढे, याची परिणती अटळ आहे. सुईच्या अग्रावर राहील एवढी जमीनही मऱ्हाठी माणसाच्या वाट्याला या पुढच्या काळात येणार नाही. उद्ध्वस्त संसार पाठीवर घेऊन स्वतःच्याच राज-धानीतून परागंदा होण्याचा प्रसंग त्यांच्यावर गुदरणार आहे. त्यांच्या ललाटी अन्य काही नाही. महाराष्ट्राचे भाषिक राज्य अस्तित्वात येऊन १ मे १९८५ रोजी पंचवीस वर्षे पूर्ण होतात. ज्या हेतूने हे राज्य, रक्त नेहमीच सांडून अस्तित्वात आले, ते हेतू सफल झालेले नाहीत. दिल्लीची सत्ता नेहमीच महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि विकासाचा गळा दाबीत आली आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न चालू आहेत. मुंबईतून मराठी माणूस परागंदा होत आहे. भाषिक धोरण तर महाराष्ट्राचे अत्यंत नुकसान करणारे आहे. या सर्व गोष्टीपासून बोध एकच घ्यायचा आहे. महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचे दिल्लीचे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत. आजचे आपले राज्यकर्ते हे दिल्लीचे सुभेदार ठरले आहेत. त्यांच्याकडून महाराष्ट्राला न्याय मिळेल या आशावादावर जगण्यात घोर निराशा आहे. `महाराष्ट्रावर अन्याय होत आहे', `मराठी भाषेवर अन्याय होत आहे', `मराठी माणसावर अन्याय होत आहे', या आशयाचा मजकूर वर्तमानपत्रातून छापून येतो. सभा - संमेलनातून या आशयाची भाषणे झोडली जातात. विधानसभेत याचा अनेकवेळा पुनरूच्चार केला जातो, पण याचे निवारण कसे करावयाचे, कोणता कार्यक्रम हाती घ्यावयाचा, याविषयी कोणीच काही करीत नाही. `लांडगा आला' ही आरोळी देत राहणे एवढेच काम. पण लांडगा येथील जीवनाशी केव्हाच एकरुप झाला आहे याचे भान अनेकांना नाही.धनराशींसह उंटाचा प्रवेशअसे का? याला महाराष्ट्रातील राजकीय पुढारी आणि सत्ताधारी जबाबदार आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक पुढाऱ्यांनी, सत्ताधाऱ्यांनी सतत कचखाऊ धोरण स्वीकारून महाराष्ट्राचे अतोनात नुकसान केले आहे. या सत्ताधाऱ्यांनी अरबांच्या उंटाला आपल्या तंबूत उगाच प्रवेश दिलेला नाही. हा उंट प्रचंड धनराशींसह या तंबूत प्रवेश करता झाला आहे. त्याच्या पैशावर नजरा असलेल्या आपल्या राज्यकर्त्यांना आपलेच घर सोडून घराबाहेर व्हावे लागेल याची कल्पना नव्हती असे नाही. पृथ्वीराज चव्हाणाचा पराभव कोणी केला? त्याचा भाऊबंद जयचंद राठोड यानेच ना? महाराष्ट्रातही असे जयचंद राठोड आहेत. यांना जरब बसवील असा एकही पुढारी आज महाराष्ट्रात नाही. लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकीत शरद पवारांसारखा एकच शिलेदार महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची पताका घेऊन महाराष्ट्रभर फिरला.विधानसभेत शिवसेनेचे नवलकर म्हणतात `मुंबईत इंदिरा कॉंग्रसने विधानसभेच्या निवडणुकीसाठी ३४ जागांपैकी २७ जागांवर अमराठी उमेदवार उभे केले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत १७० जागांपैकी ११५ अमराठी उमेदवाअ उभे केले.' प्रमोद नवलकरांना यात नवल ते का वाटावे? या सर्व परिस्थितीत कोण कोण जबाबदार आहेत याचा त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करावा. कॉंग्रसचे अखिल भारतीय राजकारण, प्रमोद नवलाकरांचे मुंबईपुरते राजकारण. निवडणुकीत जो उपयोगी पडतो. तो आपला, हे तत्त्व तर सर्वच पक्षातील पुढाऱ्यांचे आहे. त्यावेळी कोणी अमराठी आहे याचे भन किती जणांना असते? आणि या धोरणामुळेच मुंबईतून मराठी माणूस उखडला गेला याचे भान नाही कुणाला? तरीही विद्यमान परिस्थितीबद्दल नवल वाटून घ्यायचे, हीच तर नवलाची बाब आहे.महाराष्ट्रातल्या प्रत्येक पुढाऱ्याला आपण अखिल भारतीय सरूपाचे पुढारी व्हावे, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे महाराष्ट्र हिताचा बळी गेला म्हणून त्यांना त्याची पर्वा नसते. दिल्लीश्वराने बेळगावचा लचक तोडला म्हणून महाराष्ट्रातील राजकीय पुढाऱ्यांनी एकत्र येऊन लढा दिला का? प्रत्येकजण स्वतःच्या पक्षीय राजकारणात तरी घोटाळत राहिला किंवा सत्तेच्या कुंपणात अडकून पडला, पण बाहेर आला नाही. मुंबईचा लचका असाच तोडला जाणार आहे. महाराष्ट्रातील सर्वच पुढारी कोणत्या न कोणत्या अहंगंडाने किंवा स्वार्थाने पछाडलेले, त्यामुळे महाराष्ट्राबाबतच्या कुठल्याच प्रश्नावर त्यांचे एकमत होत नाही किंवा ते महाराष्ट्रासाठी एकदिलाने उभे राहतील असा भरवसा राहिलेला नाही. पुन्हा हे पुढारी कुठल्याही पक्षात असोत, ते जात, पात, धर्म याबाबतीत आतून बांधलेले असतात, त्यामुळे त्यांच्या विचारात, आचारात त्यागाची वृत्ती नसतेच, त्यांची वृत्ती इतिहासाची पाने चाळीस बसायचीच असते, कालबाह्य झालेले इतिहास चाळणे, थोर थोर पुढाऱ्यांची नावे घेणे व मुख्य प्रश्नाला बगल देणे व खाजगीत कशी बगल दिली, अशी फुशारकी मारणे ही वृत्ती, इतिहासावरून शिकायची वृत्तीच नाही. अन्याय होत आहे, एवढेच बोलायचे, तो दूर करण्यासाठी संघटीत व्हायचे नाही, एकदिलाने विरोध करावयाचा नाही. ही वृत्ती खूप जुनी आहे. त्यात मराठी राज्यकर्त्यांचे पडखाऊपणाचे धोरण. हा कचखाऊपणा किंवा मऊपणा मराठी माणसांसाठी दाखवणार नाहीत.तो परप्रांतीयांसाठी दाखवतील आणि ताठरपणा मराठी माणसांबरोबर दाखवून त्याच्याबरोबर भांडत बसतील.महाराष्ट्रातल्या परप्रांतीयांबरोबर यांचे कधी बिनसल्याचे आपण पाहिले आहे? आणि याउलट मराठी माणूस भांडखोर आहे असे म्हणायला हे परप्रांतीय पुन्हा मोकळे. मराठी माणसाला ताट देताना कोण मारामार?मराठी माणूस मराठी माणसाबरोबर खेकड्याप्रमाणे नांग्या उगारील, पण परप्रांतीय दिसला की, नांगी टाकील, कुत्र्यासारखे शेपूट घालील. कोण कुठला चंद्रकांत त्रिपाठी, पण त्याने एका फटक्यात (जो पराक्रम इंग्रज माणसानेही केला नाही ) मुंबई महानगरपालिका बरखास्त केली ना? आणि मराठी राज्यकर्त्यांनी मम म्हटले ना? यासाठी मराठ्यांचे आंदोलन झाले? नाही. प्रत्येक मराठी माणसाने हाही विचार करावा की माझ्या नाकर्तेपणामुळे आपले, महाराष्ट्राचे नुकसान झाले की नाही? माझ्या या नाकर्तेपणामुळे मुंबई, पुण्यात परप्रांतीयांचे, थैलीशहांचे प्राबल्य वाढले की नाही? इथले राज्यकर्ते फक्त आपली, आपल्या घराण्याची सोय पहात आले. स्वाभिमानपेक्षा माणूस जेव्हा स्वतःची सोय पाहतो , तेव्हा राष्ट्र नावाची संकल्पना लयाला जाते.महाराष्ट्रातील दिल्ली दर्शनभारतभर दूरदर्शन केंद्रे उभी राहिली आणि भारतीय जनता भूक-तहान विअरून कार्यक्रम पाहू लागली. महाराष्ट्रात दूरदर्शनची अठरा केंद्रे उभी आहेत (पुणे, मुंबई वगळून). आ केंद्रावरून प्रामुख्याने हिन्दी, इंग्रजीतून कार्यक्रम होतात. मराठीतून का नाहीत? महाराष्ट्राचे दर्शन नाही तर नाही. `दिल्लीचेदर्शन' घ्या. ग्रामीण महाराष्ट्रात यापैकी किती कार्यक्रम लोकांना समजतात? या कार्यक्रमात मराठीतून प्रास्ताविक का नाही? मुक्या, बहिऱ्या मेंढरांसारखे आपण ऐकतो.दिल्ली का तमाशा देखो! आपण सारे खुश आहोत. घराट दूरदर्शन आले आणि निकटचे मराठी दर्शन दूर गेले. तामिळनाडूने दिल्लीकडे डोळे वटारले की त्यांना हव्या त्या सवलती मिळतात. असे का? हे डोले वटारण्याची विद्या त्यांना कशी काय अवगत झाली? ते स्वतःचे, प्रांताचे प्राणतत्त्व जपून आहेत. त्यांची विश्वतमिळ साहित्य संमेलने भरतात. विश्वहिन्दी साहित्य संमेलने भरतात. आपल्याकडे नाके मुरडली जातात. प्रचार आणि प्रसार यांचे तत्त्व त्यांनी बरोबर जाणले आहे. दूरदर्शनवर मराठीतून होणाऱ्या कार्यक्रमांना नेहमीच कात्री लावली जाते. कधी ते रद्दही होतात. याचा जाब आमच्य राज्यकर्त्यांनी दिल्लीला कधी विचारला? हा जाब तरी कोणाला विचारणार? कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळा दूरदर्शनची दोरी गॅडगील साहेबांच्या हाती, त्यांना जो काय आमचा आणि आमच्या मराठीचा उद्धार करायचा तो करा म्हणावी राजा खुश प्रजा खुशा स्वाभिमान आला कुठे? महाराष्ट्रातल्या किती नेत्यांनी, विचारवंतांनी याला विरोध केला? मुंबई, पुण्यातील मराठी विचारवंत, नेते विरोध करणार नाहीत. त्यांच्या गरजेप्रमाणे मराठी कार्यक्रम निघतात. हिन्दी, इंग्रजीच्या मानाने तेही त्यांना बेचव वाटतात. शिवाय मराठी बातम्यांत पुन्हा असते काय?महाराष्ट्र सरकारने बसविलेला दूरदर्शन कर आपण मान्य केला. पण डॉ. सुब्रह्मण्यम् यांच्या मतदार संघतील मतदारांनी तो कसा दूर केला? मराठी मतदारांनी विरोध नोंदविला नाही, उलट तो निमूटपणे मान्य केला. आपले राज्यकर्ते आपले राहिले नाहीत याचे उत्तम उदाहरण आपले मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, डॉ. सुब्रह्मण्यम् यांच्या मतदारसंघात ते हा कर रद्द करण्याचे आश्वासन देतात. मराठी मतदाराला हे आश्वासन का नाही? हा कर आश्वासन दिल्याप्रमाणे रद्दही झाला. धन्य त्या तमीळ बांधवांची.मराठी कारभार१ मे रओजी महाराष्ट्र भाषिक राज्याची पंचविशी साजरी होणार आहे. पण मराठीतून राज्यकारभारात करावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेले परिपत्रक इंग्रजीतून काढण्यात आले. या परिपत्रकाची प्रत प्रमोद नवलकरांनी विधानसभेत फाडून टाकली. मराठ्यांचा या पराक्रमाला आम्ही टाळी देतो. मराठी भाषेचा राज्यकारभार योग्य तो आदर न बाळगल्याने मराठी माणसाला आपल्याच राजधानीत `मुंबई तुमची, भांडी घासा आमची' हे ऐकण्याचा प्रसंग उद्भवला. महाराष्ट्राच्या राजधानीतून मराठी मंत्री का घेण्यात आला नाही. आमच्या राज्यकर्त्यांकडे याचे उत्तर आहे काय? मुंबईतील लक्षावधी रुपयांचे सरकारी उत्पन्न बिहार, उत्तरप्रदेश, तमिळनाडूसाठी जाते. मुंबईतील अनेक उद्योगधंदे दिल्लीत ठरतात. महाराष्टाच्या मंत्रालयात नाहीत. मुंबईसाठी कितीही बलिदान झाले तरी आपले राज्यकर्ते मख्ख राहतील. `बॉम्बे हाय' मधून निघणाऱ्या तेल, वायू यावर मुंबई किंवा महाराष्ट्राचा अधिकार नाही, असे आता दिल्लीकर म्हणू लागले आहेत का? याचे उत्तर राज्यकर्त्यांनी द्यावे.मराठी भाषेतून कारभारमराठी भाषेचा प्रश्न मराठी राज्यकर्ते, मंत्रालयातील अनेक प्रथम दर्जांचे अधिकारी यांना अडगळीचा होऊन बसलेला आहे. मंत्रालयातील उच्चपदस्थ मराठी अधिकरी हिन्दी-इंग्रजी भाषेलाच अनुकूल आहेत. त्यांच्या उक्ती आणि कृतीत खूपच अंतर आहे. दूरदर्शनवरील हिन्दी-इंग्रजीच्या कार्यक्रमाचे प्राबल्य पाहिले की कोणती भाषा शिकाविशी वाटेल? राज्यकारभारात मराठीला जुजबी महत्त्व द्यायचे, वातावरण हिन्दी-इंग्रजीला अनुकूल ठेवायचे, असे हे ढोंगी वर्तन मागील पंचवीस वर्षे आपण पाहत आलो आहोत. नजीकच्या पंचवीस वर्षात महाराष्ट्र हिन्दी भाषेच्या पुरात बुडालेला पाहाण्याचे आपल्या नशिबी येणार की काय, याची शंका येत आहे. असे एकदा झाले की, यु. पी. बिहारींची नोकर म्हणून भरपूर आयात होईल आणि अख्खा महाराष्ट्र अगतिक झालेला असेल. हे आक्रमण थांबयाचे असेल, परप्रांतीयांनी बळकावलेली सत्ताकेंद्रे परत मिळवायची असतील तर मराठीतून सर्व कारभार होणे आवश्यकआहे. यासाठी इंग्रजी भाषेचाही उत्तम अभ्यास व्हायला पाहिजे. मराठीतून सर्व राज्यकारभार हे पुरेसे नाही. परप्रांतीयांचा महाराष्ट्रातील बडेजाव कमी करायचा असेल, त्यांच्याशी स्पर्धा करून त्यांना हुसकावून लावायचे असेल तर आपल्याला मराठी-इंग्रजी या भाषांवर प्रभुत्त्व मिळविले पाहिजे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांतून शिकणारी मुले इंग्रजी भाषेकडे दुर्लक्ष करतात आणि मराठी माध्यमांच्या शाळेत शिकणारी मुले इंग्रजी भाषेकडे दुर्लक्ष करतात. हे होऊ नये.असे चालत राहिले तर भाषिक धोरण विफल ठरेल. यामुळे इंग्रजी भाषेचे किंवा या भाषेचा पुर्स्कार करणाऱ्यांचे नुकसान होणार नाही.सरकारी उच्चपदस्थ अधिकारी, अनेक आमदार, खासदार, मंत्री यांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळांत शिक्षण घेत आहेत. त्यांच्यापैकी अनेकांचे प्राण परदेशात जाण्यासाठी कासावीस झालेले आहेत. आपण सर्वांनी मराठीचा आग्रह धरणे त्यांना परवडणारे नाही. त्यामुळे त्यांचा ओढा इंग्रजीकडेच असेल. अशावेळी मराठी भाषेचा राज्यकारभारात हट्ट धरून मराठी बरोबरच बहुजन समाजाने प्रत्येकाला इंग्रजी भाषा उत्तम कशी येईल याचा विचार सतत मनाशी बाळगला पाहिजे. परप्रांतीयांना महाराष्ट्रात येणारा लोंढा थांबविला पाहिजे. म्हणजे मराठी माणसाला डावलून त्यांना रोजगार उद्योगधंदे मिळणार नाहीत, याची तजवीज केली पाहिजे. प्रत्येक मराठी माणसाने मराठीचा आग्रह धरला पाहिजे. महाराष्ट्रात हिन्दीचा प्रभाव फार मोठा आहे. हिन्दी भाषिकच मराठी माणसाला प्रथम देशोधडीला लावतील. अनेक मराठी भाषिक हिन्दीचे उत्तम अभ्यासक असूनही, त्यांची योग्यता असूनही हिन्दी भाषेच्या अनुषंगाने मिळणाऱ्या नोकऱ्या हिन्दी भाषिक त्यांना मिळू देत नाहीत. हिन्दी भाषिक अहिन्दी प्रदेशातील नोकऱ्यांच्या स्पर्धेत उत्तरतात व त्या मिळवून अहिन्दी प्रदेशातील लोकांना बेरोजगार करतात. यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण होतो.इंग्रजी- मराठी भाषा धोरणमराठी भाषिकांना यापुढे मराठी-इंग्रजी किंवा इंग्रजी-मराठी असाच शिक्षणातील भाषिक क्रम स्वीकारावा लागेल, असे मला वाटते. हिन्दी भाषेला फार महत्त्व देऊ नये. हिन्दीबद्दल माझ्या मनात अनादराची भावना नाही. उपयुक्तता या दृष्टीने इंग्रजीचा उपयोग अधिक आहे. महाराष्ट्राला हिन्दी येत नाही म्हणून महाराष्ट्राचे नुकसान होणार नाही. हिन्दी भाषेला फार महत्त्व देणे म्हणजे समस्त उत्तर भारताला महाराष्ट्रात रान मोकळे करून देण्यासारखे आहे.मुंबईत मराठी माध्यमांच्या संस्था चालकांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू केल्या आहेत. हिंदु कॉलनीतील `किंग जॉर्ज' शाळेचे नांव `राजा शिवाजी विद्यालय' असे असले तरी तेथे राजा शिवाजीचे वास्तव्य नाही. तेथे किंग जॉर्जच वास्तव्य करून आहे. हे शहाण्यांनी लक्षात घ्यावे. राजा शिवाजीच्या मावळ्यांना इथे अग्रक्रमाने प्रवेश मिळतो की नाही हे पहायला हवे. यासाठी दुसरा आपल्यासाठी प्रयत्न करील हे मराठी माणसाने विसरावे. यापुढे सरकार चांगल्या शाळा काढील किंवा सरकारने चांगल्या शाळा काढाव्यात ही भाबडी समजूत विसरून जावे.आज महाराष्ट्रात शिक्षणाचे जवळ जवळ राष्ट्रीयीकरण झालेले आहे. राष्ट्रीयीकरण झाले की त्याचे काय परिणाम होतात हे आज आपण अनुभवीत आहोत. लोकांनीच उत्तम शिक्षणासाठी प्रयत्न करायला हवेत. केवळ अनिच्छेने देणग्या देऊन हा प्रश्न सुटणार नाही. नुसत्या वसाहती उभ्या करून भागणार नाही. वसाहतीत चांगल्या शाळा व क्रिडांगणे यांची तरतूद कशी होईल याचा नव्याने विचार व्हायला हवा. एक काळ राष्ट्रीय चळवळीचा होता. `पैसा फंड' शाळ उभ्या राहिल्या. तो जमाना संपला असे म्हणून चालणार नाही. पुन्हा नव्याने या प्रश्नाकडे पाहिले पाहिजे.अभ्यासक्रम आखताना ग्रामीण महाराष्ट्राकडे पाठ करून आणि पुण्यामुंबईसारख्या शहरांकडे उन्मुख होऊन ते आखले जातात. यात महाराष्ट्रापेक्षा परप्रांतीयांचे अधिक फावते. आपले महाराष्ट्र सरकार भारतातल्या सर्व भाषिकांसाठी त्यांच्याच भाषेतून, त्यांच्याच लिपीतून एस्. एस्. सी., एच् एस्. सी. ची परीक्षा घेते. केवढे हे औदार्य? सिंधी भाषिकांसाठी तर दोन लिप्या उपलब्ध आहेत. इतर कोणत्या प्रांतात हे औदार्य आहे? मराठी भाषिकांसाठी देवनागरी लिपीतून किती प्रांत परीक्षा घेतात? दरवर्षी किती मराठी भाषिक विद्यार्थी या परीक्षांना बसतात? याची आकडेवारी आमच्या सरकारकडे उपलब्ध असल्यास, तुलनेसाठी जाहीर करावी.नोकऱ्यांचे प्रश्नमहाराष्ट्रात इंग्रजी आश्रयाने वाढणाऱ्या नोकऱ्यांचा एक महावृक्ष वाढतो आहे. सर्व खाजगी कंपन्या, केंद्र सरकारच्या सर्व कचऱ्या, केंद्रीय उद्योग यांचे व्यवहार इंग्रजीशिवाय कोणत्याच भाषेत चालत नाहीत. या नोकऱ्या मिळाव्यात अशी अपेक्षा असेल तर उत्तम इंग्रजी व मराठी यायला हवे. मुंबई विद्यापीठासारखी विद्यापीठे परप्रांतीयांना नोकऱ्या पुरवण्यात अग्रभागी आहेत. आपलेच बांधव त्यांना याबाबतीत मदत करीत आहेत. टेक्निकल शिक्षण देणाऱ्या संस्था, विद्यालये, महाविद्यालये या ठिकाणी इंग्रजीचे प्राबल्य आहे. इथे अजून मराठी माध्यम आलेले नाही. ते येईल तेव्हा येईल.मुंबई उच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश म्हणतात की, तामिळनाडूत हायकोर्टाचा व्यवहार तमिळ भाषेत चालतो. महाराष्ट्रात मराठीतून व्यवहार चालू शकतो, पण सरकार प्रयत्न कधी करते पाहू या. तोपर्यंत तरी आपल्याला मराठीचे महत्त्व लक्षात घ्यायला हवे व या व्यवहारासाठी मराठीचा आग्रह धरायला हवा, मुंबई उच्चन्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माधव रेड्डी हे परप्रांतीय आहेत. त्यांनीच ही कबूली दिली आहे. मराठी न्यायाधीश असी कबुली देत नाहीत, याचे वाईट वाटते. सार्वजनिक हिताचे बोलणाऱ्यांची पिढी संपली काय?मुंबई विद्यापीठाचे काय?इंग्रजी भाषेकडे बहुजन समाजाने मुळीच दुर्लक्ष करू नये. एक उदाहरण म्हणून मुंबई विद्यापीठाचे उदाहरण देतो. या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या आपल्या काही महाविद्यालयात इंग्रजीतून शिकविण्यासाठी पुरेसे शिक्षक मिळत नाहीत म्हणून परप्रांतातील शिक्षकांच्या नेमणुका केल्या जातात. शिक्षक मिळत नाहीत. हा आभासही काही विद्यालये निर्माण करतात व आपल्याला हव्या त्या शिक्षकांच्या नेमणुका केल्या जातात. परप्रांतातून येणाऱ्या या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांचीही रीतसर चौकशी केली जातेच, असे नाही. याशिवाय काही प्रांतात प्रथम वर्गात पास होणाऱ्यांचे प्रमाणही जबरदस्त आहे. महाराष्ट्रात शैक्षणिक दर्जाचा बाऊ फार होतो. त्यामुळे मराठी माणसांना नोकऱ्यांत माघार पत्करावी लागते. राखीव जागांबाबतचे धोरण महाराष्ट्रातल्या पुरोगामी म्हणविल्या जाणाऱ्या विद्यापीठांनी कितीसे अंमलात आणले? याचा जरा शोध घ्यावा. आमच्या या देशात जेथे अजून उच्चवर्णियांतही जातीभेद आहे तेथे इतरांच्या बाबतीत काय बोलावे?मराठी माणसाची जबाबदारीयाबाबतीत महत्त्वाचा मुद्दा असा की महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार सर्व कारभार मराठीतून होणार आहे. म्हणून महाराष्ट्रात सर्व काही मराठीमय होणार आहे, असा त्याचा अर्थ कोणीही घेऊ नये. सरकार धोरण आखते. आपण मराठी माणसे त्याचा फायदा घेणार आहोत की नाही हे महत्त्वाचे. मराठी पत्राला आपणच जर इंग्रजीतून उत्तर देऊ लागली तर सरकारी धोरण अपयशी ठरेल. ते अपयशी होऊ नये म्हणून आपण मराठीचा अधिकाधिक उपयोग करणे आवश्यक आहे. एखाद्याला मराठी येत नसेल तर इंग्रजीतून क्वचित प्रसंगी उत्तर देणे गैर नाही. पण नेहमीच नाही. काही प्रसंगी लवचिकपणा आपल्यात हवा. पण तो आपले नुकसान करीत नसेल तरच आवश्यक समजवा. स्वतःची गैरसोय करून इतरांची सोय करण्यात आपले नुकसान आहे, याचे भान सतत असले पाहिजे. हे भान नसेल तर मुंबई आपल्या हातून निघून जाण्याची पाळी येईल. आज मुंबई महाराष्ट्राच्या नकाशावर आहे, ती महाराष्ट्रात नाही किंवा महाराष्ट्र मुंबईत नाही. याला जबाबदार असणारे राज्यकर्तेच हे कबूल करतात, हे आपले दुर्दैव आहे.मुंबईवर टांगती तलवार संयुक्त महाराष्ट्रासाठी चळवळ झाली. १०५ हुतात्म्यांचे रक्त सांडले. त्यांचे बलिदान व्यर्थ न हो. बेळगाव, कारवार, निपाणी या प्रदेशांवर आपल्याला उदक सोडावे लागले. आता मुंबईवरही उदक सोडावे लागते की काय न कळे. आपले मराठी राज्यकर्ते दिल्लीश्वरा इशारावर नाचायाला लागल्यामुळे आणि केवळ सत्ता टिकविण्यात व्यग्र राहिल्यामुळे महाराष्ट्राच्या भाषिक राज्याची गोड फळे आपल्याला चाखायाला मिळाली नाही. आपले राज्यकर्ते स्वार्थी आणि कचखाऊ आहेत. १९६० साली महाराष्ट्राचे मराठी भाषिक राज्य अस्तित्वात आले, तेव्हा मुंबईत मराठी माणसांचे प्रमाण ५४टक्के होते. ते आता पंचवीस वर्षानंतर २५ टक्क्यावर आले. अख्खी मुंबई महाराष्ट्र सरकारने थैलीशाहंच्या स्वाधीन केली. आपली छोटी छोटी घरे, मोडकळीस आलेल्या इमारती, आपुरी घरे, प्रचंड लोकवस्ती वाढलेले जागांचे भरमसाठ भाव, प्रचंड महागाई या सर्वांच्या स्पर्धेत नोकरदार मराठी माणूस टिकणे कठीण आहे. त्याला वाढत्या जबाबदाऱ्यांना तोंड देता येणे अशक्य झाले. या नोकरदार वर्गाच्या पाठीशी मागील पंचवीस वर्षात मराठी सरकार कधीच उभे राहिले नाहि. सरकारने काही प्रमाणत गाळे बांधले पण पुरेसे आर्थिक सहाय्य सरकारने न देऊ केल्यामुळे मराठी माणसाला ते घेता आले नाहीत. ज्याला मराठी भाषेचा गंधही नव्हता, मराठी परंपरा ठाऊक नव्हत्या, तो परप्रांतीय माणूस मात्र खोटी प्रमाणपत्रे सादर करून आपण पंधरा वर्षे महाराष्ट्रात राहतो, हे सिद्ध करुन मुंबईचा मालक बनला. मराठी माणसाच्या आर्थिक कुचंबणेचा फायदा घेऊन तो मराठी माणसाच्या घरात घुसला आणि या घुसखोरीला मराठी सरकारने भरपूर खतपाणी घातले. मराठी माणूस डोंबिवली-बोरीवली पर्यंत मागे हटला. नवीन मुंबईतही मराठी माणसाची हीच अवस्था आहे. एखाद्या प्रांतात, भरपूर नोकऱ्या उपलब्ध होतात म्हणून परप्रांतीयांनी त्या प्रांतात जावे हा विचार पटणारा असला तरी त्या प्रांतातील स्थानिक लोकांच्या पोटावर पाय देऊन, त्यांना निर्वासित करून नोकऱ्या मिळविणे हा त्याचा अर्थ नव्हे. शिवाय त्या त्या प्रांतांनी आपआपल्या प्रांतात व्यवसाय उपलब्ध करुन देणे हे त्या त्या प्रांतांचे कर्तव्य ठरते. आपल्या प्रांतातील लोकांमुळे इतर प्रांतातील लोकांचे जीवण दुस्सह करण्याने त्यांच्या वाट्याला तिरस्कार आणि मत्सर येणार, हे त्यांनी पक्के लक्षात ठेवावे. यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला धोका संभवतो. महाराष्ट्र सरकारला असे सांगावेसे वाटते की, परप्रांतीयांच्या उंटाचे पिल्लू तुम्हांला कितीही आवडले तरी ते घरात बाळगू नये. ते घरात मोठे झाले की त्याला बाहेर काढण्यासाठी घर मोडावे लागते. प्रत्येकाला परप्रांतात जाऊन रहाण्याचा अधिकार घटनेने कितीही दिला असला तरी आक्रमण करा आणि इतरांना, स्थानिकांना निर्वासित करा, बेरोजगार करा असा अधिकार तर घटनेने दिलेला नाही? असाच घटनेचा अर्थ असेल तर महाराष्ट्राच्या सीमेवर अशा लोकांना अट्कआव करण्याची पाळी मराठी माणसावर येऊ नये, हीच इच्छा.
"मुंबै'' कुणाची, मराठी माणसांची? छे छे! विसरा ती स्वप्ने कायमची !१९६० साली महाराष्ट्रराज्यनिर्मिती झाली तेव्हा मुंबईत मराठी माणसाचे प्रमान ५४ टक्के होते. आज २५ वर्षांनंतर ते २५ टक्क्यांहून कमी आहे. मोडकळीला आलेली मराठी माणसांची घरे, जागांच्या किंमतीत झालेली बेसुमार वाढ, प्रचंड लोकवस्ती आणि प्रतिदिनी "मुंबै" वर आदळणारे परप्रांतीयांचे लोंढे, याची परिणती अटळ आहे. सुईच्या अग्रावर राहील एवढी जमीनही मऱ्हाठी माणसाच्या वाट्याला या पुढच्या काळात येणार नाही. उद्ध्वस्त संसार पाठीवर घेऊन स्वतःच्याच राज-धानीतून परागंदा होण्याचा प्रसंग त्यांच्यावर गुदरणार आहे. त्यांच्या ललाटी अन्य काही नाही. महाराष्ट्राचे भाषिक राज्य अस्तित्वात येऊन १ मे १९८५ रोजी पंचवीस वर्षे पूर्ण होतात. ज्या हेतूने हे राज्य, रक्त नेहमीच सांडून अस्तित्वात आले, ते हेतू सफल झालेले नाहीत. दिल्लीची सत्ता नेहमीच महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि विकासाचा गळा दाबीत आली आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न चालू आहेत. मुंबईतून मराठी माणूस परागंदा होत आहे. भाषिक धोरण तर महाराष्ट्राचे अत्यंत नुकसान करणारे आहे. या सर्व गोष्टीपासून बोध एकच घ्यायचा आहे. महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचे दिल्लीचे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत. आजचे आपले राज्यकर्ते हे दिल्लीचे सुभेदार ठरले आहेत. त्यांच्याकडून महाराष्ट्राला न्याय मिळेल या आशावादावर जगण्यात घोर निराशा आहे. `महाराष्ट्रावर अन्याय होत आहे', `मराठी भाषेवर अन्याय होत आहे', `मराठी माणसावर अन्याय होत आहे', या आशयाचा मजकूर वर्तमानपत्रातून छापून येतो. सभा - संमेलनातून या आशयाची भाषणे झोडली जातात. विधानसभेत याचा अनेकवेळा पुनरूच्चार केला जातो, पण याचे निवारण कसे करावयाचे, कोणता कार्यक्रम हाती घ्यावयाचा, याविषयी कोणीच काही करीत नाही. `लांडगा आला' ही आरोळी देत राहणे एवढेच काम. पण लांडगा येथील जीवनाशी केव्हाच एकरुप झाला आहे याचे भान अनेकांना नाही.धनराशींसह उंटाचा प्रवेशअसे का? याला महाराष्ट्रातील राजकीय पुढारी आणि सत्ताधारी जबाबदार आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक पुढाऱ्यांनी, सत्ताधाऱ्यांनी सतत कचखाऊ धोरण स्वीकारून महाराष्ट्राचे अतोनात नुकसान केले आहे. या सत्ताधाऱ्यांनी अरबांच्या उंटाला आपल्या तंबूत उगाच प्रवेश दिलेला नाही. हा उंट प्रचंड धनराशींसह या तंबूत प्रवेश करता झाला आहे. त्याच्या पैशावर नजरा असलेल्या आपल्या राज्यकर्त्यांना आपलेच घर सोडून घराबाहेर व्हावे लागेल याची कल्पना नव्हती असे नाही. पृथ्वीराज चव्हाणाचा पराभव कोणी केला? त्याचा भाऊबंद जयचंद राठोड यानेच ना? महाराष्ट्रातही असे जयचंद राठोड आहेत. यांना जरब बसवील असा एकही पुढारी आज महाराष्ट्रात नाही. लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकीत शरद पवारांसारखा एकच शिलेदार महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची पताका घेऊन महाराष्ट्रभर फिरला.विधानसभेत शिवसेनेचे नवलकर म्हणतात `मुंबईत इंदिरा कॉंग्रसने विधानसभेच्या निवडणुकीसाठी ३४ जागांपैकी २७ जागांवर अमराठी उमेदवार उभे केले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत १७० जागांपैकी ११५ अमराठी उमेदवाअ उभे केले.' प्रमोद नवलकरांना यात नवल ते का वाटावे? या सर्व परिस्थितीत कोण कोण जबाबदार आहेत याचा त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करावा. कॉंग्रसचे अखिल भारतीय राजकारण, प्रमोद नवलाकरांचे मुंबईपुरते राजकारण. निवडणुकीत जो उपयोगी पडतो. तो आपला, हे तत्त्व तर सर्वच पक्षातील पुढाऱ्यांचे आहे. त्यावेळी कोणी अमराठी आहे याचे भन किती जणांना असते? आणि या धोरणामुळेच मुंबईतून मराठी माणूस उखडला गेला याचे भान नाही कुणाला? तरीही विद्यमान परिस्थितीबद्दल नवल वाटून घ्यायचे, हीच तर नवलाची बाब आहे.महाराष्ट्रातल्या प्रत्येक पुढाऱ्याला आपण अखिल भारतीय सरूपाचे पुढारी व्हावे, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे महाराष्ट्र हिताचा बळी गेला म्हणून त्यांना त्याची पर्वा नसते. दिल्लीश्वराने बेळगावचा लचक तोडला म्हणून महाराष्ट्रातील राजकीय पुढाऱ्यांनी एकत्र येऊन लढा दिला का? प्रत्येकजण स्वतःच्या पक्षीय राजकारणात तरी घोटाळत राहिला किंवा सत्तेच्या कुंपणात अडकून पडला, पण बाहेर आला नाही. मुंबईचा लचका असाच तोडला जाणार आहे. महाराष्ट्रातील सर्वच पुढारी कोणत्या न कोणत्या अहंगंडाने किंवा स्वार्थाने पछाडलेले, त्यामुळे महाराष्ट्राबाबतच्या कुठल्याच प्रश्नावर त्यांचे एकमत होत नाही किंवा ते महाराष्ट्रासाठी एकदिलाने उभे राहतील असा भरवसा राहिलेला नाही. पुन्हा हे पुढारी कुठल्याही पक्षात असोत, ते जात, पात, धर्म याबाबतीत आतून बांधलेले असतात, त्यामुळे त्यांच्या विचारात, आचारात त्यागाची वृत्ती नसतेच, त्यांची वृत्ती इतिहासाची पाने चाळीस बसायचीच असते, कालबाह्य झालेले इतिहास चाळणे, थोर थोर पुढाऱ्यांची नावे घेणे व मुख्य प्रश्नाला बगल देणे व खाजगीत कशी बगल दिली, अशी फुशारकी मारणे ही वृत्ती, इतिहासावरून शिकायची वृत्तीच नाही. अन्याय होत आहे, एवढेच बोलायचे, तो दूर करण्यासाठी संघटीत व्हायचे नाही, एकदिलाने विरोध करावयाचा नाही. ही वृत्ती खूप जुनी आहे. त्यात मराठी राज्यकर्त्यांचे पडखाऊपणाचे धोरण. हा कचखाऊपणा किंवा मऊपणा मराठी माणसांसाठी दाखवणार नाहीत.तो परप्रांतीयांसाठी दाखवतील आणि ताठरपणा मराठी माणसांबरोबर दाखवून त्याच्याबरोबर भांडत बसतील.महाराष्ट्रातल्या परप्रांतीयांबरोबर यांचे कधी बिनसल्याचे आपण पाहिले आहे? आणि याउलट मराठी माणूस भांडखोर आहे असे म्हणायला हे परप्रांतीय पुन्हा मोकळे. मराठी माणसाला ताट देताना कोण मारामार?मराठी माणूस मराठी माणसाबरोबर खेकड्याप्रमाणे नांग्या उगारील, पण परप्रांतीय दिसला की, नांगी टाकील, कुत्र्यासारखे शेपूट घालील. कोण कुठला चंद्रकांत त्रिपाठी, पण त्याने एका फटक्यात (जो पराक्रम इंग्रज माणसानेही केला नाही ) मुंबई महानगरपालिका बरखास्त केली ना? आणि मराठी राज्यकर्त्यांनी मम म्हटले ना? यासाठी मराठ्यांचे आंदोलन झाले? नाही. प्रत्येक मराठी माणसाने हाही विचार करावा की माझ्या नाकर्तेपणामुळे आपले, महाराष्ट्राचे नुकसान झाले की नाही? माझ्या या नाकर्तेपणामुळे मुंबई, पुण्यात परप्रांतीयांचे, थैलीशहांचे प्राबल्य वाढले की नाही? इथले राज्यकर्ते फक्त आपली, आपल्या घराण्याची सोय पहात आले. स्वाभिमानपेक्षा माणूस जेव्हा स्वतःची सोय पाहतो , तेव्हा राष्ट्र नावाची संकल्पना लयाला जाते.महाराष्ट्रातील दिल्ली दर्शनभारतभर दूरदर्शन केंद्रे उभी राहिली आणि भारतीय जनता भूक-तहान विअरून कार्यक्रम पाहू लागली. महाराष्ट्रात दूरदर्शनची अठरा केंद्रे उभी आहेत (पुणे, मुंबई वगळून). आ केंद्रावरून प्रामुख्याने हिन्दी, इंग्रजीतून कार्यक्रम होतात. मराठीतून का नाहीत? महाराष्ट्राचे दर्शन नाही तर नाही. `दिल्लीचेदर्शन' घ्या. ग्रामीण महाराष्ट्रात यापैकी किती कार्यक्रम लोकांना समजतात? या कार्यक्रमात मराठीतून प्रास्ताविक का नाही? मुक्या, बहिऱ्या मेंढरांसारखे आपण ऐकतो.दिल्ली का तमाशा देखो! आपण सारे खुश आहोत. घराट दूरदर्शन आले आणि निकटचे मराठी दर्शन दूर गेले. तामिळनाडूने दिल्लीकडे डोळे वटारले की त्यांना हव्या त्या सवलती मिळतात. असे का? हे डोले वटारण्याची विद्या त्यांना कशी काय अवगत झाली? ते स्वतःचे, प्रांताचे प्राणतत्त्व जपून आहेत. त्यांची विश्वतमिळ साहित्य संमेलने भरतात. विश्वहिन्दी साहित्य संमेलने भरतात. आपल्याकडे नाके मुरडली जातात. प्रचार आणि प्रसार यांचे तत्त्व त्यांनी बरोबर जाणले आहे. दूरदर्शनवर मराठीतून होणाऱ्या कार्यक्रमांना नेहमीच कात्री लावली जाते. कधी ते रद्दही होतात. याचा जाब आमच्य राज्यकर्त्यांनी दिल्लीला कधी विचारला? हा जाब तरी कोणाला विचारणार? कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळा दूरदर्शनची दोरी गॅडगील साहेबांच्या हाती, त्यांना जो काय आमचा आणि आमच्या मराठीचा उद्धार करायचा तो करा म्हणावी राजा खुश प्रजा खुशा स्वाभिमान आला कुठे? महाराष्ट्रातल्या किती नेत्यांनी, विचारवंतांनी याला विरोध केला? मुंबई, पुण्यातील मराठी विचारवंत, नेते विरोध करणार नाहीत. त्यांच्या गरजेप्रमाणे मराठी कार्यक्रम निघतात. हिन्दी, इंग्रजीच्या मानाने तेही त्यांना बेचव वाटतात. शिवाय मराठी बातम्यांत पुन्हा असते काय?महाराष्ट्र सरकारने बसविलेला दूरदर्शन कर आपण मान्य केला. पण डॉ. सुब्रह्मण्यम् यांच्या मतदार संघतील मतदारांनी तो कसा दूर केला? मराठी मतदारांनी विरोध नोंदविला नाही, उलट तो निमूटपणे मान्य केला. आपले राज्यकर्ते आपले राहिले नाहीत याचे उत्तम उदाहरण आपले मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, डॉ. सुब्रह्मण्यम् यांच्या मतदारसंघात ते हा कर रद्द करण्याचे आश्वासन देतात. मराठी मतदाराला हे आश्वासन का नाही? हा कर आश्वासन दिल्याप्रमाणे रद्दही झाला. धन्य त्या तमीळ बांधवांची.मराठी कारभार१ मे रओजी महाराष्ट्र भाषिक राज्याची पंचविशी साजरी होणार आहे. पण मराठीतून राज्यकारभारात करावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेले परिपत्रक इंग्रजीतून काढण्यात आले. या परिपत्रकाची प्रत प्रमोद नवलकरांनी विधानसभेत फाडून टाकली. मराठ्यांचा या पराक्रमाला आम्ही टाळी देतो. मराठी भाषेचा राज्यकारभार योग्य तो आदर न बाळगल्याने मराठी माणसाला आपल्याच राजधानीत `मुंबई तुमची, भांडी घासा आमची' हे ऐकण्याचा प्रसंग उद्भवला. महाराष्ट्राच्या राजधानीतून मराठी मंत्री का घेण्यात आला नाही. आमच्या राज्यकर्त्यांकडे याचे उत्तर आहे काय? मुंबईतील लक्षावधी रुपयांचे सरकारी उत्पन्न बिहार, उत्तरप्रदेश, तमिळनाडूसाठी जाते. मुंबईतील अनेक उद्योगधंदे दिल्लीत ठरतात. महाराष्टाच्या मंत्रालयात नाहीत. मुंबईसाठी कितीही बलिदान झाले तरी आपले राज्यकर्ते मख्ख राहतील. `बॉम्बे हाय' मधून निघणाऱ्या तेल, वायू यावर मुंबई किंवा महाराष्ट्राचा अधिकार नाही, असे आता दिल्लीकर म्हणू लागले आहेत का? याचे उत्तर राज्यकर्त्यांनी द्यावे.मराठी भाषेतून कारभारमराठी भाषेचा प्रश्न मराठी राज्यकर्ते, मंत्रालयातील अनेक प्रथम दर्जांचे अधिकारी यांना अडगळीचा होऊन बसलेला आहे. मंत्रालयातील उच्चपदस्थ मराठी अधिकरी हिन्दी-इंग्रजी भाषेलाच अनुकूल आहेत. त्यांच्या उक्ती आणि कृतीत खूपच अंतर आहे. दूरदर्शनवरील हिन्दी-इंग्रजीच्या कार्यक्रमाचे प्राबल्य पाहिले की कोणती भाषा शिकाविशी वाटेल? राज्यकारभारात मराठीला जुजबी महत्त्व द्यायचे, वातावरण हिन्दी-इंग्रजीला अनुकूल ठेवायचे, असे हे ढोंगी वर्तन मागील पंचवीस वर्षे आपण पाहत आलो आहोत. नजीकच्या पंचवीस वर्षात महाराष्ट्र हिन्दी भाषेच्या पुरात बुडालेला पाहाण्याचे आपल्या नशिबी येणार की काय, याची शंका येत आहे. असे एकदा झाले की, यु. पी. बिहारींची नोकर म्हणून भरपूर आयात होईल आणि अख्खा महाराष्ट्र अगतिक झालेला असेल. हे आक्रमण थांबयाचे असेल, परप्रांतीयांनी बळकावलेली सत्ताकेंद्रे परत मिळवायची असतील तर मराठीतून सर्व कारभार होणे आवश्यकआहे. यासाठी इंग्रजी भाषेचाही उत्तम अभ्यास व्हायला पाहिजे. मराठीतून सर्व राज्यकारभार हे पुरेसे नाही. परप्रांतीयांचा महाराष्ट्रातील बडेजाव कमी करायचा असेल, त्यांच्याशी स्पर्धा करून त्यांना हुसकावून लावायचे असेल तर आपल्याला मराठी-इंग्रजी या भाषांवर प्रभुत्त्व मिळविले पाहिजे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांतून शिकणारी मुले इंग्रजी भाषेकडे दुर्लक्ष करतात आणि मराठी माध्यमांच्या शाळेत शिकणारी मुले इंग्रजी भाषेकडे दुर्लक्ष करतात. हे होऊ नये.असे चालत राहिले तर भाषिक धोरण विफल ठरेल. यामुळे इंग्रजी भाषेचे किंवा या भाषेचा पुर्स्कार करणाऱ्यांचे नुकसान होणार नाही.सरकारी उच्चपदस्थ अधिकारी, अनेक आमदार, खासदार, मंत्री यांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळांत शिक्षण घेत आहेत. त्यांच्यापैकी अनेकांचे प्राण परदेशात जाण्यासाठी कासावीस झालेले आहेत. आपण सर्वांनी मराठीचा आग्रह धरणे त्यांना परवडणारे नाही. त्यामुळे त्यांचा ओढा इंग्रजीकडेच असेल. अशावेळी मराठी भाषेचा राज्यकारभारात हट्ट धरून मराठी बरोबरच बहुजन समाजाने प्रत्येकाला इंग्रजी भाषा उत्तम कशी येईल याचा विचार सतत मनाशी बाळगला पाहिजे. परप्रांतीयांना महाराष्ट्रात येणारा लोंढा थांबविला पाहिजे. म्हणजे मराठी माणसाला डावलून त्यांना रोजगार उद्योगधंदे मिळणार नाहीत, याची तजवीज केली पाहिजे. प्रत्येक मराठी माणसाने मराठीचा आग्रह धरला पाहिजे. महाराष्ट्रात हिन्दीचा प्रभाव फार मोठा आहे. हिन्दी भाषिकच मराठी माणसाला प्रथम देशोधडीला लावतील. अनेक मराठी भाषिक हिन्दीचे उत्तम अभ्यासक असूनही, त्यांची योग्यता असूनही हिन्दी भाषेच्या अनुषंगाने मिळणाऱ्या नोकऱ्या हिन्दी भाषिक त्यांना मिळू देत नाहीत. हिन्दी भाषिक अहिन्दी प्रदेशातील नोकऱ्यांच्या स्पर्धेत उत्तरतात व त्या मिळवून अहिन्दी प्रदेशातील लोकांना बेरोजगार करतात. यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण होतो.इंग्रजी- मराठी भाषा धोरणमराठी भाषिकांना यापुढे मराठी-इंग्रजी किंवा इंग्रजी-मराठी असाच शिक्षणातील भाषिक क्रम स्वीकारावा लागेल, असे मला वाटते. हिन्दी भाषेला फार महत्त्व देऊ नये. हिन्दीबद्दल माझ्या मनात अनादराची भावना नाही. उपयुक्तता या दृष्टीने इंग्रजीचा उपयोग अधिक आहे. महाराष्ट्राला हिन्दी येत नाही म्हणून महाराष्ट्राचे नुकसान होणार नाही. हिन्दी भाषेला फार महत्त्व देणे म्हणजे समस्त उत्तर भारताला महाराष्ट्रात रान मोकळे करून देण्यासारखे आहे.मुंबईत मराठी माध्यमांच्या संस्था चालकांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू केल्या आहेत. हिंदु कॉलनीतील `किंग जॉर्ज' शाळेचे नांव `राजा शिवाजी विद्यालय' असे असले तरी तेथे राजा शिवाजीचे वास्तव्य नाही. तेथे किंग जॉर्जच वास्तव्य करून आहे. हे शहाण्यांनी लक्षात घ्यावे. राजा शिवाजीच्या मावळ्यांना इथे अग्रक्रमाने प्रवेश मिळतो की नाही हे पहायला हवे. यासाठी दुसरा आपल्यासाठी प्रयत्न करील हे मराठी माणसाने विसरावे. यापुढे सरकार चांगल्या शाळा काढील किंवा सरकारने चांगल्या शाळा काढाव्यात ही भाबडी समजूत विसरून जावे.आज महाराष्ट्रात शिक्षणाचे जवळ जवळ राष्ट्रीयीकरण झालेले आहे. राष्ट्रीयीकरण झाले की त्याचे काय परिणाम होतात हे आज आपण अनुभवीत आहोत. लोकांनीच उत्तम शिक्षणासाठी प्रयत्न करायला हवेत. केवळ अनिच्छेने देणग्या देऊन हा प्रश्न सुटणार नाही. नुसत्या वसाहती उभ्या करून भागणार नाही. वसाहतीत चांगल्या शाळा व क्रिडांगणे यांची तरतूद कशी होईल याचा नव्याने विचार व्हायला हवा. एक काळ राष्ट्रीय चळवळीचा होता. `पैसा फंड' शाळ उभ्या राहिल्या. तो जमाना संपला असे म्हणून चालणार नाही. पुन्हा नव्याने या प्रश्नाकडे पाहिले पाहिजे.अभ्यासक्रम आखताना ग्रामीण महाराष्ट्राकडे पाठ करून आणि पुण्यामुंबईसारख्या शहरांकडे उन्मुख होऊन ते आखले जातात. यात महाराष्ट्रापेक्षा परप्रांतीयांचे अधिक फावते. आपले महाराष्ट्र सरकार भारतातल्या सर्व भाषिकांसाठी त्यांच्याच भाषेतून, त्यांच्याच लिपीतून एस्. एस्. सी., एच् एस्. सी. ची परीक्षा घेते. केवढे हे औदार्य? सिंधी भाषिकांसाठी तर दोन लिप्या उपलब्ध आहेत. इतर कोणत्या प्रांतात हे औदार्य आहे? मराठी भाषिकांसाठी देवनागरी लिपीतून किती प्रांत परीक्षा घेतात? दरवर्षी किती मराठी भाषिक विद्यार्थी या परीक्षांना बसतात? याची आकडेवारी आमच्या सरकारकडे उपलब्ध असल्यास, तुलनेसाठी जाहीर करावी.नोकऱ्यांचे प्रश्नमहाराष्ट्रात इंग्रजी आश्रयाने वाढणाऱ्या नोकऱ्यांचा एक महावृक्ष वाढतो आहे. सर्व खाजगी कंपन्या, केंद्र सरकारच्या सर्व कचऱ्या, केंद्रीय उद्योग यांचे व्यवहार इंग्रजीशिवाय कोणत्याच भाषेत चालत नाहीत. या नोकऱ्या मिळाव्यात अशी अपेक्षा असेल तर उत्तम इंग्रजी व मराठी यायला हवे. मुंबई विद्यापीठासारखी विद्यापीठे परप्रांतीयांना नोकऱ्या पुरवण्यात अग्रभागी आहेत. आपलेच बांधव त्यांना याबाबतीत मदत करीत आहेत. टेक्निकल शिक्षण देणाऱ्या संस्था, विद्यालये, महाविद्यालये या ठिकाणी इंग्रजीचे प्राबल्य आहे. इथे अजून मराठी माध्यम आलेले नाही. ते येईल तेव्हा येईल.मुंबई उच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश म्हणतात की, तामिळनाडूत हायकोर्टाचा व्यवहार तमिळ भाषेत चालतो. महाराष्ट्रात मराठीतून व्यवहार चालू शकतो, पण सरकार प्रयत्न कधी करते पाहू या. तोपर्यंत तरी आपल्याला मराठीचे महत्त्व लक्षात घ्यायला हवे व या व्यवहारासाठी मराठीचा आग्रह धरायला हवा, मुंबई उच्चन्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माधव रेड्डी हे परप्रांतीय आहेत. त्यांनीच ही कबूली दिली आहे. मराठी न्यायाधीश असी कबुली देत नाहीत, याचे वाईट वाटते. सार्वजनिक हिताचे बोलणाऱ्यांची पिढी संपली काय?मुंबई विद्यापीठाचे काय?इंग्रजी भाषेकडे बहुजन समाजाने मुळीच दुर्लक्ष करू नये. एक उदाहरण म्हणून मुंबई विद्यापीठाचे उदाहरण देतो. या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या आपल्या काही महाविद्यालयात इंग्रजीतून शिकविण्यासाठी पुरेसे शिक्षक मिळत नाहीत म्हणून परप्रांतातील शिक्षकांच्या नेमणुका केल्या जातात. शिक्षक मिळत नाहीत. हा आभासही काही विद्यालये निर्माण करतात व आपल्याला हव्या त्या शिक्षकांच्या नेमणुका केल्या जातात. परप्रांतातून येणाऱ्या या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांचीही रीतसर चौकशी केली जातेच, असे नाही. याशिवाय काही प्रांतात प्रथम वर्गात पास होणाऱ्यांचे प्रमाणही जबरदस्त आहे. महाराष्ट्रात शैक्षणिक दर्जाचा बाऊ फार होतो. त्यामुळे मराठी माणसांना नोकऱ्यांत माघार पत्करावी लागते. राखीव जागांबाबतचे धोरण महाराष्ट्रातल्या पुरोगामी म्हणविल्या जाणाऱ्या विद्यापीठांनी कितीसे अंमलात आणले? याचा जरा शोध घ्यावा. आमच्या या देशात जेथे अजून उच्चवर्णियांतही जातीभेद आहे तेथे इतरांच्या बाबतीत काय बोलावे?मराठी माणसाची जबाबदारीयाबाबतीत महत्त्वाचा मुद्दा असा की महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार सर्व कारभार मराठीतून होणार आहे. म्हणून महाराष्ट्रात सर्व काही मराठीमय होणार आहे, असा त्याचा अर्थ कोणीही घेऊ नये. सरकार धोरण आखते. आपण मराठी माणसे त्याचा फायदा घेणार आहोत की नाही हे महत्त्वाचे. मराठी पत्राला आपणच जर इंग्रजीतून उत्तर देऊ लागली तर सरकारी धोरण अपयशी ठरेल. ते अपयशी होऊ नये म्हणून आपण मराठीचा अधिकाधिक उपयोग करणे आवश्यक आहे. एखाद्याला मराठी येत नसेल तर इंग्रजीतून क्वचित प्रसंगी उत्तर देणे गैर नाही. पण नेहमीच नाही. काही प्रसंगी लवचिकपणा आपल्यात हवा. पण तो आपले नुकसान करीत नसेल तरच आवश्यक समजवा. स्वतःची गैरसोय करून इतरांची सोय करण्यात आपले नुकसान आहे, याचे भान सतत असले पाहिजे. हे भान नसेल तर मुंबई आपल्या हातून निघून जाण्याची पाळी येईल. आज मुंबई महाराष्ट्राच्या नकाशावर आहे, ती महाराष्ट्रात नाही किंवा महाराष्ट्र मुंबईत नाही. याला जबाबदार असणारे राज्यकर्तेच हे कबूल करतात, हे आपले दुर्दैव आहे.मुंबईवर टांगती तलवार संयुक्त महाराष्ट्रासाठी चळवळ झाली. १०५ हुतात्म्यांचे रक्त सांडले. त्यांचे बलिदान व्यर्थ न हो. बेळगाव, कारवार, निपाणी या प्रदेशांवर आपल्याला उदक सोडावे लागले. आता मुंबईवरही उदक सोडावे लागते की काय न कळे. आपले मराठी राज्यकर्ते दिल्लीश्वरा इशारावर नाचायाला लागल्यामुळे आणि केवळ सत्ता टिकविण्यात व्यग्र राहिल्यामुळे महाराष्ट्राच्या भाषिक राज्याची गोड फळे आपल्याला चाखायाला मिळाली नाही. आपले राज्यकर्ते स्वार्थी आणि कचखाऊ आहेत. १९६० साली महाराष्ट्राचे मराठी भाषिक राज्य अस्तित्वात आले, तेव्हा मुंबईत मराठी माणसांचे प्रमाण ५४टक्के होते. ते आता पंचवीस वर्षानंतर २५ टक्क्यावर आले. अख्खी मुंबई महाराष्ट्र सरकारने थैलीशाहंच्या स्वाधीन केली. आपली छोटी छोटी घरे, मोडकळीस आलेल्या इमारती, आपुरी घरे, प्रचंड लोकवस्ती वाढलेले जागांचे भरमसाठ भाव, प्रचंड महागाई या सर्वांच्या स्पर्धेत नोकरदार मराठी माणूस टिकणे कठीण आहे. त्याला वाढत्या जबाबदाऱ्यांना तोंड देता येणे अशक्य झाले. या नोकरदार वर्गाच्या पाठीशी मागील पंचवीस वर्षात मराठी सरकार कधीच उभे राहिले नाहि. सरकारने काही प्रमाणत गाळे बांधले पण पुरेसे आर्थिक सहाय्य सरकारने न देऊ केल्यामुळे मराठी माणसाला ते घेता आले नाहीत. ज्याला मराठी भाषेचा गंधही नव्हता, मराठी परंपरा ठाऊक नव्हत्या, तो परप्रांतीय माणूस मात्र खोटी प्रमाणपत्रे सादर करून आपण पंधरा वर्षे महाराष्ट्रात राहतो, हे सिद्ध करुन मुंबईचा मालक बनला. मराठी माणसाच्या आर्थिक कुचंबणेचा फायदा घेऊन तो मराठी माणसाच्या घरात घुसला आणि या घुसखोरीला मराठी सरकारने भरपूर खतपाणी घातले. मराठी माणूस डोंबिवली-बोरीवली पर्यंत मागे हटला. नवीन मुंबईतही मराठी माणसाची हीच अवस्था आहे. एखाद्या प्रांतात, भरपूर नोकऱ्या उपलब्ध होतात म्हणून परप्रांतीयांनी त्या प्रांतात जावे हा विचार पटणारा असला तरी त्या प्रांतातील स्थानिक लोकांच्या पोटावर पाय देऊन, त्यांना निर्वासित करून नोकऱ्या मिळविणे हा त्याचा अर्थ नव्हे. शिवाय त्या त्या प्रांतांनी आपआपल्या प्रांतात व्यवसाय उपलब्ध करुन देणे हे त्या त्या प्रांतांचे कर्तव्य ठरते. आपल्या प्रांतातील लोकांमुळे इतर प्रांतातील लोकांचे जीवण दुस्सह करण्याने त्यांच्या वाट्याला तिरस्कार आणि मत्सर येणार, हे त्यांनी पक्के लक्षात ठेवावे. यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला धोका संभवतो. महाराष्ट्र सरकारला असे सांगावेसे वाटते की, परप्रांतीयांच्या उंटाचे पिल्लू तुम्हांला कितीही आवडले तरी ते घरात बाळगू नये. ते घरात मोठे झाले की त्याला बाहेर काढण्यासाठी घर मोडावे लागते. प्रत्येकाला परप्रांतात जाऊन रहाण्याचा अधिकार घटनेने कितीही दिला असला तरी आक्रमण करा आणि इतरांना, स्थानिकांना निर्वासित करा, बेरोजगार करा असा अधिकार तर घटनेने दिलेला नाही? असाच घटनेचा अर्थ असेल तर महाराष्ट्राच्या सीमेवर अशा लोकांना अट्कआव करण्याची पाळी मराठी माणसावर येऊ नये, हीच इच्छा.
Wednesday, August 25, 2010
Friday, August 20, 2010
हरिश्चंद्रगड
Harishchandragad
ट्रेकक्षितिज पुण्याहून नाशिक मार्गावर आळेफाटा येथे येऊन कल्यान मुरबाडकडे जाणाऱ्या हमरस्त्यावर माळशेज घाटाच्या अलीकडे खुबी हे गांव आहे. येथे उतरून खुबी रस्त्याने खिरेश्वर गावातून गडावर जाण्यासाठी पायी रस्ता आहे. ( पायी अंतर ४ ते ५ तास ) हा गड पूर्व-पश्चिम असा पसरला आहे. पश्मिमेला कोकणकडा हा एक अद्वितीय निसर्गाविष्कार आहे. अर्धवर्तुळाकार आणि डोकावणाऱ्या ह्या कातळकड्याची सरळ उंची १५०० फूट आहे. खिरेश्वर येथील एक प्रेक्षणीय मंदिर व लेणे धरणाच्या पाण्याखाली गेले आहे.
किल्ल्याची उंची : ४००० फुट
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग : माळशेज
जिल्हा : नगर
श्रेणी : मध्यम
हरिश्चंद्रगड(Harishchandragad) म्हणजे नगर जिल्ह्याचे महाबळेश्वर ! ठाणे, पुणे आणि नगर यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड, एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे. इतर सर्व किल्ल्यांना मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहेत हरिश्चंद्रगडाला तर दोन चार हजार वर्षांपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहुबाजूंनी नटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींनी नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्राचा उल्लेख प्राचीन अग्नीपुराणात व मत्स्यपुराणात आढलतो. १७४७ - ४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली.
गडावरील पहाण्यासाखी ठिकाणे :
टोलारखिंडीच्या वाटेने गडावर आल्यावर आपण रोहीदास शिखरापाशी पोहचतो. येथून तास दीड तासात आपण तारामती शिखरापाशी पोहचतो. पायथ्याशीच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे.
हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर :
तळापासून या मंदिराची उंची साधारणतः
सोळा मीटर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच `मंगळगंगेचा उगम' असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहाआहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथऱ्यात जमिनीत खाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत `चांगदेव ऋषींनी' चौदाशे वर्ष तप केल आहे असे स्थानिक गावकरी सांगतात.
'शके चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा । मार्गशिर
तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ॥ हरिश्चंद्रनाम
पर्वतु । तेथ महादेव भक्तु । सुरसिद्ध गणी विरुयातु ।
सेविजे जो ॥ हरिश्चंद्र देवता ॥ मंगळगंगा सरिता ।
सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान । ब्रम्हस्थळ ब्रम्हन
संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु । लिंगी जगन्नाथु ।
महादेओ ॥ जोतीर्थासि तीर्थ । केदारांसि तुकिनाति ।
आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा ॥'
हे चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबावर, भिंतीवर आढळतात. श्री चांगदेवांनी येथे तपश्चर्या करून `तत्वसार' नावाचा ग्रंथ लिहिला. येथील एका शिलालेखावर, चक्रपाणी वटेश्वरनंदतु । तस्य सुतु वीकट देऊ ॥ अशा ओळी वाचता येतात.
मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच एक छोटे मंदिर आहे. यातही महादेवाची पिंड आहे. या छोट्या मंदिरासमोरच एकभाग्न अवस्थेतील मूर्ती आहेत. त्यातील पाषाणावर राजा हरिश्चंद्र डोंबाऱ्यांच्या घरी कावडीने पाणी भरत असलेला प्रसंग चित्रित केला आहे.
केदारश्वराची गुहा :
मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डाव्या
हातास एकगुहा लागते. याला केदारेश्वराची गुहा असेही म्हणतात. या गुहेत १ मीटर उंच आणि २ मीटर लांब असे शिवलिंग आहे. यात कमरभर पाणी आहे. ही गुहा खरंतर चार खांबावर तोलली होती पण सद्यःस्थितीला एकच खांब शाबूत आहे. याच गुहेत एक खोलीही आहे. खोलीच्या डाव्या हाताच्या भिंतीवर शिवपूजनाचा प्रसंग कोरलेला आहे. या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालावयाची असल्यास बर्फतुल्य पाण्यातून जावे लागते.
तारामती शिखर :
तारामती शिखर गडावरील सर्वात उंच शिखर आहे. साधारणतः उम्ची ४८५० फूटा. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुफेत गणेशाची सुमारे साडेआठ फूटाची भव्य आणि सुंदरमूर्ती आहे. याच गणेशगुहेच्या आजुबाजुला अनेक गुहा आहेत. यातही राहण्याची सोय होते. गुहेच्यासमोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाईनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल, घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळता येतात. शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुख आढळतात. माथ्यावर दोन ते तीन शिवलिंग आढळतात.
कोकणकडा :
कोकणकडा म्हणजे हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण. कोकणकडा म्हणजे गिर्यारोहकांना आकर्षणाचे स्थान. अर्ध्या किलोमीटर परिघाचा , वाटीसारखा अर्धगोल आकाराचा काळाकभिन्न रौद्रभीषण कोकणकडा हा एकमेवाद्वितीय असावा. कड्याची सरळधार १७०० फूटा भरेल. पायथ्यापासून कड्याची उंची साधारणतः ४५०० फूट भरते. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पहाण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीयच आहे. १८३५ मध्ये कर्नल साईक्सला येथे आहे.
गडावर चहापाण्याची व जेवणाची सोय होते. पावसाळ्यात मात्र या गडाचे सौंदर्य काही औरच असते. विविधता या गडाएवढी इतरत्र कुठेही आढळणार नाही. करवंद, कारावीच्या जाळी, धायटी, उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल इत्यादी वनस्पती येथे आढळतात. या भागातील प्राणीवैभव मात्र शिकाऱ्यामुळे बरेच कमी झाले आहे. तरीही कोल्हे, तरस, रानडुकरे, बिबळ्या, ससे, भेकर, रानमांजरे इत्यादी प्राणी आढळतात. गडाचे सर्वोच्च शिखर तारामतीवरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाईची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड हा परिसर दिसतो. अशा तऱ्हेने अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड `ट्रेकर्सची पंढरी' ठरतो.
गडावर जाण्याच्या वाटा :
हरिश्चंद्रगड पूर्ण पाहवयाचा असल्यास दोनते तीन दिवसांची सवड हवी. गडाचा घेरा फार मोठा असल्याने गडावर जाण्याच्या वाटाही फार आहेत.
खिरेश्वर गावातून वाट :
सर्वात प्रचलित असणारी वाटही खिरेश्वर गावातून गडावर येते. या वाटेने येण्यासाठी पुण्याहून आळेफाटा मार्गे अथवा कल्याणहून मुरबाड-माळशेज घाट मार्गे खुबी फाट्यास उतरावे. खुबी फाट्यावरून धरणावरून चालत गेल्यावर ५ कि.मी. अंतरावर खिरेश्वर गाव लागते. हरिश्चंद्रगडावर जाताना खिरेश्वर गावातून अदमासे एक कि.मी. अंतरावर खिरेश्वराचे प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर अकराव्या शतकातील यादवकालीन मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरील सभामंडप छताला शिल्प पट्टीका बसवलेले आहे. आतील गाभारा असलेल्या दाराच्या माथ्यावर शेषयायी विष्णू व परिवाराचे अप्रतिम कोरीव शिल्प आहे. मूषकवाहन मकर-रति, अशा अनेक कोरीव प्रतिमा येथील पाषाणावर आढळतात. या मंदिराला `नागेश्वराचे मंदिर' असेही म्हणतात. या गावातून दोन वाटा गडावर जातात. १. एक वाट ही टोलार खिंडीतून गडावर सुमारे ३ तासात मंदिरापर्यंत पोहचते. २. दुसरी वाट ही राजदरवाजाची वाट आहे. ही वाट पूर्वी प्रचलित होती. आता मात्र वाटाड्याशिवाय या वाटेने गडावर जाऊ नये. या वाटेने आपण गडाच्या जुन्नर दरवाज्यापाशी पोहचतो. या मार्गाने जाताना गावातील विहिरीतून पाणी भरून घेतले पाहिजे कारण वाटेत कुठेच पाणी नाही.
नगर जिल्ह्यातून :
हरिश्चंद्रगडावर जाण्याची एक वाट ही नगर जिल्ह्यातून आहे. यासाठी मुंबई-नाशिक हमरस्त्यावरील घोटी या गावी उतरावे. तिथून संगमनेर मार्गावरील राजूर या गावी जावे. राजूरवरून गडावर दोन मार्गांनी चढाई करता येते. १. राजुर-पाचनई अशी बससेवा उपलब्ध आहे. हे अंतर सुमारे २९ कि.मी. भरते. पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव असून येथून गड गाठण्यास सुमारे ३ तास लागतात. वाट फारच सोपी आहे. पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे अंतर सुमारे ६ कि.मी. आहे. २. हल्लीच राजूर ते टोलारखिंड अशी खाजगी वाहनसेवा उपलब्ध झाली आहे. राजूर, अंबीट, पाचनई, मूळा नदीच्या खोऱ्यातून, धनचक्कर या बालेश्वर रांगेतील टेकाडास वळसा घालून ही वाट टोलारखिंडीत पोहचते. ही वाट सरळ एक तासात टोलारखिंडीत घेऊन जाते. समोरच एक व्याघ्रशिल्प आढळते. येथून वर जाणारा रस्ता हा दमछाक करणारा आहे. येथून २ तासात मंदिरात पोहचता येते.
सावर्णे-बेलपाडा-साधले असा घाटमार्ग :
गड सर करण्यासाठी एक सावर्णे-बेलपाडा-साधले असा घाटामार्ग आहे. परंतु हा मार्ग फारच अवघड असल्याने प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असलेल्यांनीच हा मार्ग अवलंबाना. या मार्गे येण्यासाठी कल्याण-मुरबाड मार्गे माळ्शेजघाट चालू होण्यापूर्वी सावर्णेगावात उतरावे. येथून `बेलपाडा' या कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावात यावे. येथून कड्यातून काढलेल्या साधले घाटाच्या सहाय्याने कोकणकड्याच्या पठारावर जाता येते. या वाटेने मंदिर गाठण्यास सुमारे दीड दिवस लागतो. या वाटेलाच `नळीची वाट' असेही म्हणतात.
Harishchandragad
ट्रेकक्षितिज पुण्याहून नाशिक मार्गावर आळेफाटा येथे येऊन कल्यान मुरबाडकडे जाणाऱ्या हमरस्त्यावर माळशेज घाटाच्या अलीकडे खुबी हे गांव आहे. येथे उतरून खुबी रस्त्याने खिरेश्वर गावातून गडावर जाण्यासाठी पायी रस्ता आहे. ( पायी अंतर ४ ते ५ तास ) हा गड पूर्व-पश्चिम असा पसरला आहे. पश्मिमेला कोकणकडा हा एक अद्वितीय निसर्गाविष्कार आहे. अर्धवर्तुळाकार आणि डोकावणाऱ्या ह्या कातळकड्याची सरळ उंची १५०० फूट आहे. खिरेश्वर येथील एक प्रेक्षणीय मंदिर व लेणे धरणाच्या पाण्याखाली गेले आहे.
किल्ल्याची उंची : ४००० फुट
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग : माळशेज
जिल्हा : नगर
श्रेणी : मध्यम
हरिश्चंद्रगड(Harishchandragad) म्हणजे नगर जिल्ह्याचे महाबळेश्वर ! ठाणे, पुणे आणि नगर यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड, एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे. इतर सर्व किल्ल्यांना मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहेत हरिश्चंद्रगडाला तर दोन चार हजार वर्षांपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहुबाजूंनी नटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींनी नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्राचा उल्लेख प्राचीन अग्नीपुराणात व मत्स्यपुराणात आढलतो. १७४७ - ४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली.
गडावरील पहाण्यासाखी ठिकाणे :
टोलारखिंडीच्या वाटेने गडावर आल्यावर आपण रोहीदास शिखरापाशी पोहचतो. येथून तास दीड तासात आपण तारामती शिखरापाशी पोहचतो. पायथ्याशीच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे.
हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर :
तळापासून या मंदिराची उंची साधारणतः
सोळा मीटर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच `मंगळगंगेचा उगम' असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहाआहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथऱ्यात जमिनीत खाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत `चांगदेव ऋषींनी' चौदाशे वर्ष तप केल आहे असे स्थानिक गावकरी सांगतात.
'शके चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा । मार्गशिर
तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ॥ हरिश्चंद्रनाम
पर्वतु । तेथ महादेव भक्तु । सुरसिद्ध गणी विरुयातु ।
सेविजे जो ॥ हरिश्चंद्र देवता ॥ मंगळगंगा सरिता ।
सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान । ब्रम्हस्थळ ब्रम्हन
संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु । लिंगी जगन्नाथु ।
महादेओ ॥ जोतीर्थासि तीर्थ । केदारांसि तुकिनाति ।
आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा ॥'
हे चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबावर, भिंतीवर आढळतात. श्री चांगदेवांनी येथे तपश्चर्या करून `तत्वसार' नावाचा ग्रंथ लिहिला. येथील एका शिलालेखावर, चक्रपाणी वटेश्वरनंदतु । तस्य सुतु वीकट देऊ ॥ अशा ओळी वाचता येतात.
मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच एक छोटे मंदिर आहे. यातही महादेवाची पिंड आहे. या छोट्या मंदिरासमोरच एकभाग्न अवस्थेतील मूर्ती आहेत. त्यातील पाषाणावर राजा हरिश्चंद्र डोंबाऱ्यांच्या घरी कावडीने पाणी भरत असलेला प्रसंग चित्रित केला आहे.
केदारश्वराची गुहा :
मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डाव्या
हातास एकगुहा लागते. याला केदारेश्वराची गुहा असेही म्हणतात. या गुहेत १ मीटर उंच आणि २ मीटर लांब असे शिवलिंग आहे. यात कमरभर पाणी आहे. ही गुहा खरंतर चार खांबावर तोलली होती पण सद्यःस्थितीला एकच खांब शाबूत आहे. याच गुहेत एक खोलीही आहे. खोलीच्या डाव्या हाताच्या भिंतीवर शिवपूजनाचा प्रसंग कोरलेला आहे. या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालावयाची असल्यास बर्फतुल्य पाण्यातून जावे लागते.
तारामती शिखर :
तारामती शिखर गडावरील सर्वात उंच शिखर आहे. साधारणतः उम्ची ४८५० फूटा. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुफेत गणेशाची सुमारे साडेआठ फूटाची भव्य आणि सुंदरमूर्ती आहे. याच गणेशगुहेच्या आजुबाजुला अनेक गुहा आहेत. यातही राहण्याची सोय होते. गुहेच्यासमोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाईनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल, घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळता येतात. शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुख आढळतात. माथ्यावर दोन ते तीन शिवलिंग आढळतात.
कोकणकडा :
कोकणकडा म्हणजे हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण. कोकणकडा म्हणजे गिर्यारोहकांना आकर्षणाचे स्थान. अर्ध्या किलोमीटर परिघाचा , वाटीसारखा अर्धगोल आकाराचा काळाकभिन्न रौद्रभीषण कोकणकडा हा एकमेवाद्वितीय असावा. कड्याची सरळधार १७०० फूटा भरेल. पायथ्यापासून कड्याची उंची साधारणतः ४५०० फूट भरते. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पहाण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीयच आहे. १८३५ मध्ये कर्नल साईक्सला येथे आहे.
गडावर चहापाण्याची व जेवणाची सोय होते. पावसाळ्यात मात्र या गडाचे सौंदर्य काही औरच असते. विविधता या गडाएवढी इतरत्र कुठेही आढळणार नाही. करवंद, कारावीच्या जाळी, धायटी, उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल इत्यादी वनस्पती येथे आढळतात. या भागातील प्राणीवैभव मात्र शिकाऱ्यामुळे बरेच कमी झाले आहे. तरीही कोल्हे, तरस, रानडुकरे, बिबळ्या, ससे, भेकर, रानमांजरे इत्यादी प्राणी आढळतात. गडाचे सर्वोच्च शिखर तारामतीवरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाईची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड हा परिसर दिसतो. अशा तऱ्हेने अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड `ट्रेकर्सची पंढरी' ठरतो.
गडावर जाण्याच्या वाटा :
हरिश्चंद्रगड पूर्ण पाहवयाचा असल्यास दोनते तीन दिवसांची सवड हवी. गडाचा घेरा फार मोठा असल्याने गडावर जाण्याच्या वाटाही फार आहेत.
खिरेश्वर गावातून वाट :
सर्वात प्रचलित असणारी वाटही खिरेश्वर गावातून गडावर येते. या वाटेने येण्यासाठी पुण्याहून आळेफाटा मार्गे अथवा कल्याणहून मुरबाड-माळशेज घाट मार्गे खुबी फाट्यास उतरावे. खुबी फाट्यावरून धरणावरून चालत गेल्यावर ५ कि.मी. अंतरावर खिरेश्वर गाव लागते. हरिश्चंद्रगडावर जाताना खिरेश्वर गावातून अदमासे एक कि.मी. अंतरावर खिरेश्वराचे प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर अकराव्या शतकातील यादवकालीन मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरील सभामंडप छताला शिल्प पट्टीका बसवलेले आहे. आतील गाभारा असलेल्या दाराच्या माथ्यावर शेषयायी विष्णू व परिवाराचे अप्रतिम कोरीव शिल्प आहे. मूषकवाहन मकर-रति, अशा अनेक कोरीव प्रतिमा येथील पाषाणावर आढळतात. या मंदिराला `नागेश्वराचे मंदिर' असेही म्हणतात. या गावातून दोन वाटा गडावर जातात. १. एक वाट ही टोलार खिंडीतून गडावर सुमारे ३ तासात मंदिरापर्यंत पोहचते. २. दुसरी वाट ही राजदरवाजाची वाट आहे. ही वाट पूर्वी प्रचलित होती. आता मात्र वाटाड्याशिवाय या वाटेने गडावर जाऊ नये. या वाटेने आपण गडाच्या जुन्नर दरवाज्यापाशी पोहचतो. या मार्गाने जाताना गावातील विहिरीतून पाणी भरून घेतले पाहिजे कारण वाटेत कुठेच पाणी नाही.
नगर जिल्ह्यातून :
हरिश्चंद्रगडावर जाण्याची एक वाट ही नगर जिल्ह्यातून आहे. यासाठी मुंबई-नाशिक हमरस्त्यावरील घोटी या गावी उतरावे. तिथून संगमनेर मार्गावरील राजूर या गावी जावे. राजूरवरून गडावर दोन मार्गांनी चढाई करता येते. १. राजुर-पाचनई अशी बससेवा उपलब्ध आहे. हे अंतर सुमारे २९ कि.मी. भरते. पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव असून येथून गड गाठण्यास सुमारे ३ तास लागतात. वाट फारच सोपी आहे. पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे अंतर सुमारे ६ कि.मी. आहे. २. हल्लीच राजूर ते टोलारखिंड अशी खाजगी वाहनसेवा उपलब्ध झाली आहे. राजूर, अंबीट, पाचनई, मूळा नदीच्या खोऱ्यातून, धनचक्कर या बालेश्वर रांगेतील टेकाडास वळसा घालून ही वाट टोलारखिंडीत पोहचते. ही वाट सरळ एक तासात टोलारखिंडीत घेऊन जाते. समोरच एक व्याघ्रशिल्प आढळते. येथून वर जाणारा रस्ता हा दमछाक करणारा आहे. येथून २ तासात मंदिरात पोहचता येते.
सावर्णे-बेलपाडा-साधले असा घाटमार्ग :
गड सर करण्यासाठी एक सावर्णे-बेलपाडा-साधले असा घाटामार्ग आहे. परंतु हा मार्ग फारच अवघड असल्याने प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असलेल्यांनीच हा मार्ग अवलंबाना. या मार्गे येण्यासाठी कल्याण-मुरबाड मार्गे माळ्शेजघाट चालू होण्यापूर्वी सावर्णेगावात उतरावे. येथून `बेलपाडा' या कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावात यावे. येथून कड्यातून काढलेल्या साधले घाटाच्या सहाय्याने कोकणकड्याच्या पठारावर जाता येते. या वाटेने मंदिर गाठण्यास सुमारे दीड दिवस लागतो. या वाटेलाच `नळीची वाट' असेही म्हणतात.
Subscribe to:
Comments (Atom)

